डॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय ?

४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेन्डम भाग १ व भाग २ केले.भारतात बौद्ध धम्माचे कशा प्रकारे उत्थान करता येईल यावर विविध योजना परिषदेत मांडल्या.त्यात क्र ६ चा मुद्दा असा होता की बौद्ध धम्माच्या अनुयाया साठी छोट्या स्वरूपात धम्म ग्रंथाची आवश्यकता आहे कारण धर्मांतरीत बौद्धांची ग्रंथाची गरज पूर्ण करने आवश्यक होते.ते म्हणाले कि,पाली भाषेतील ७३ खंड वाचण्याची अपेक्षा सामान्य व्यक्ती कडुन करता येणे शक्य नाही.या ग्रंथात भ.बुद्धाच्या सामाजिक व नैतिक शिकवणुकीवर भर (Emphasis) देणे आवश्यक राहिल.

ते म्हणाले की,ध्यान,मनाचे निरीक्षण व अभीधम्म यावर फार भर दिला जात आहे .या मार्गाने भारता मधे बौद्ध धम्म नवनिर्मित ग्रंथात प्रस्तुत केला तर आमच्या धेय्यात अडथळा निर्माण होईल.डॉ बाबासाहेब English मधे काय म्हणाले,
6)I will now turn to the preliminary steps which must be taken for the revival of the Buddhism in India I mention below those that occur to me
1)The preparation of Buddhist Gospel which could be a constant companion of the convert.The want of a small Gospel containing the teaching of the Buddha is a great handicap in propogation of Buddhism in having the message of christ,contained in a small booklet.The Bible This handicap in the way of the propagation of Buddhism must be removed.In regard to the preparation of Buddhas Gospel care must be taken to emphasis (भर देणे)the social and moral teaching of the Buddh.I have to emphasis(हे मी भर देवून सांगत आहे कारण) this because what is emphasis is meditation,contemplation and Abhidhamma.(ध्यान,अनुपश्यना आणि अभीध् म्म या वरच अधिक भर दिल्या जात आहे) This way of presenting Buddhism to Indian would be fatal to our cause. (या मार्गाने जर बुद्ध धर्म भारतात प्रस्तुत केला तर तो आमच्या हेतु साठी अडथळा ठरेल किंवा घातक ठरेल) fatal चा अर्थ अडथळा सुद्धा होतो. रस्त्यात अपघात होतो तेव्हा fatal आक्सिडेंट म्हणतात fatal शब्द त्यावेळी घातक अर्थी वापरतात.

अन्यथा अडथळा असा अर्थ आहे.बरे ते काही का असू द्या,या वरून आपल्या लक्षात येईल की,त्यांनी धम्म ग्रंथ लिहताना ध्यान व अभीधम्म या वर अधिक भर द्यायचा नाही असे म्हटले,Emphasis म्हणजे भर देणे होते.भर न देणे म्हणजे नाकारने होत नाही.पुस्तक लिहताना या बाबी सुध्दा बुद्ध आणि धम्म ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात कायानुपश्यना,चित्तानुपश्यना,वेदनापश्यना,धम्मानुपश्यना नमुद केली आहे.सम्य्क समाधी चा तर उल्लेख आहेच,३५ वेळा Meditation शब्ददेखील आहे.अभीध् म्म शिवाय बुद्ध धम्म कसा पूर्ण होवू शकेल ?

ग्रंथ लिहताना अधिक भर कशावर द्यायचा व कशावर द्यायचा नाही या बाबत डॉ बाबासाहेब बोलले,त्या वेळी म्यानमार मधे निव्वळ जंगलात जावून ध्यान करणारे भिक्कू होते तसे बाबासाहेबानी बघितले होते.ते नको होते तर धम्म प्रचारक हवे होते.नुकतेच हिंदू धर्मातून बाहेर आलेल्या समाजाला स्वाभिमानी चळवळीत(self respect movement) पक्व करायचे होते.शील आणि नैतिकता शिकवणे गरजेचे होते.लगेचच ध्यानाकडे अधिक भर दिला तर चळवळीला गती आली नसती.पण डॉ बाबासाहेब आंबेडकरानी ते नाकारले नाही हे स्पष्ट आहे अधिक भर न देणे not Emphasis म्हणजे नकारान्त नव्हे.not Emphasis म्हणजे अधिक भर न देने होते. नाकारले असते तर स्पष्ट पणे I do not accept किंवा I denied it असे लिहले असते.ते स्पष्टवक्ते होते.हा मुद्दा पुस्तकातील मसुदा कसा राहील या वर होता.लेखक एखाद्या मुद्द्यावर अधिक भर न देता मुद्दा कायम ठेवत असतो तसे बाबासाहेब म्हणाले.सटिपठ्ठान सुत्त डॉ बाबासाहेब कसे काय नाकारतातील ? तो तर बुद्धाचा शोध आहे.सुत्तपीटका चा अविभाज्य अंग आहे.

विपश्यना ला खूप महत्व द्या असे आम्ही सुद्धा म्हणत नाही आमचे म्हणणे असे की तो बुद्धा चा सतिपठ्ठान सूत्तातिल उपदेश आहे हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे.त्यावर टीका करू नका,टिंगल करू नका,.द्वेष करू नका.
संवर्धन करा.तुम्ही विपश्यना करा की नका करू पण धम्म उपदेशाची चुगली करून गैरसमज पसरवू नका .

contemplation म्हणजे विपश्यना असा अर्थ डॉ बाबासाहेब अम्बेड्करानी पाली शब्द कोशात (लेखन आणि भाषणे खंड १६) मध्ये सांगितला आहे Contemplation म्हणजे विपश्यना बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात बाबासाहेबानी खालील प्रमाणे धम्म म्हणजे काय या प्रकरणात लिहले आहे.

Herin a monk abides contemplating the body as body,(कायानुपश्यना ) strenuous,mi.dful and self possessed,having overcome both the bankering and discontent common in the world
He abides contemating the feelings as feeling (वेदनानुपश्यना )
He abides contemplating the mind as mind ?(चित्तानुपश्यना)
He abides contemating the ideas as ideas ,(धम्माणुपश्यना )
डॉ बाबासाहेबा च्या इंग्रजी मेमोरेन्डम ४ डिसेंबर १९५४ चा अर्थ नीट समजून न घेता बाबासाहेबानी विपश्यना नाकारली म्हणून ओरड केली जाते.सामान्य माणसाची दिशा भूल केली जात आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आनापान चा अर्थ, ‘Inhaled,extended,breath, inspiration, respiration’ असा पाली डिक्शनरीत (खंड १६) सांगितला आहे.ते स्वतः ध्यान करायचे असा उल्लेख चांगदेव खैर्मोडे लिखित चरित्र ग्रंथात आहे.असे सर्व असताना ते ध्यान विरोधी होते,विपश्यना विरोधी होते असा अपप्रचार केला जातो या अशा लोकांपासून सावध रहा.

विपश्यना चा इतका स्पष्ट उल्लेख डॉ बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथात केला असूनही त्यांनी विपश्यना नाकारली असा अप प्रचार करणे समाजाची दिशाभूल करणे आहे.

शब्दांचे अर्थ :-
१) Emphasis :- (giving) special importance or attention (एखाद्या गोष्टीकडे दिलेले) विशेष लक्ष किंवा (तिला दिलेले) विशेष महत्व,प्राधान्य,भर.
(Oxford English-English-Marathi Dictionary Page No,452)

२)आनापान :- Inhaled,extended breath, inspiration, respiration (आन +अपान)
(पाली शब्द कोश खंड १६ लेखक डॉ बाबासाहेब आम्बेडकर )
३)विपस्सको हा पाली शब्द आहे विपश्यना चे क्रियापद त्याचा इंग्रजी अर्थ खुद्द डॉ बाबासाहेब अम्बेडकरानी दिला तो असा Contemplating,endowed with
(पाली शब्द कोश Volume १६ लेखक डॉ बाबासाहेब अम्बेडकर )
या वरून आपल्या लक्षात येईल की डॉ बाबासाहेबानी विपश्यना नाकारली नाही.तर स्वीकारली आहे .

सम्यक समाधी चा उपदेश म्हणजे काय ?मनात वाईट विचार येवू न देणे आलेले बाहेर काढणे . हे कसे साध्य करायचे ?? केवळ वंदना म्हटल्या ने शक्य आहे काय ? मुळीच नाही तर या साठी सतीपत्ठान सुत्त हे प्रॅक्टिकल आहे.ज्यामुळे मन निर्मळ होईल अर्थात सम्य्क समाधीचा उद्देश पूर्ण होईल.बौद्ध धम्मा तिल सम्यक समाधी म्हणजे हिंदू समाधी नव्हे.बुवाबाबाची नव्हे .बुद्धा च्या विपश्यना ध्यान पद्धती मधे उपासक सतत जागरूक असतो.मनावर पहारा देत असतो.हे ध्यान एकदा अवगत झाले की केवळ बसून विपश्यना करायची नसून २४ तास करू शकता.आपण काय करतो याची सतत जाणीव ठेवणे.याला स्म्रूतिची प्रतिष्ठापणा म्हणजे सतीपठाण सुत्त म्हणतात हे विशिष्ट पणे केल्या जाते म्हणून विपश्यना म्हणतात.

विपश्यना शिबिरात शील पालन अनिवार्य असते,१० पारमिता चा अभ्यास सुद्धा आपल्याला समजतो जो कुठेच समजाविले जात नाही.मैत्री भावना व अष्टशील तसेच बुद्धाचे उपदेश प्रवचनात सांगितल्या जाते .विपश्यना शिबिर म्हणजे धम्म उपदेशा ची प्रयोग शाळा आहे.

Satish Ghewande

सर्व ग्रूपवर लगेचच पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?