माझ्या मते, “संविधान ,कितीही चांगले असो. ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे .ते जर अप्रमाणिक असतील तर संविधान वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही आणि संविधान किती वाईट असो पण ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.” संविधानाचा अंमल हा संपूर्णता संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो .संविधान हे केवळ राज्याचे काही भाग जसे की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ ,न्यायपालिका निर्माण करून देते राज्याच्या या विभागाचे कार्य लोकांनी लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून केलेले राजकीय पक्ष त्यावर अवलंबून राहणार आहे. केवळ बाह्य स्वरूपात नव्हे .तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे?
माझ्या मते ,पहिली गोष्ट जी आपण केली पाहिजे. ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचेच कास धरली पाहिजे. याचा अर्थ हा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग पूर्णतः दूर सारला पाहिजे .याचा अर्थ कायदेभंग असहकार, सत्याग्रह या मार्गाला आपण दूर ठेवले पाहिजे आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पुर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता .त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहे तेव्हा या असंवैधानिक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही .हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते आपल्या हिताचे होईल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट ,जिचे पालन केले पाहिजे. ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते “लोकांनी आपले स्वातंत्र्य किती मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला मर्यादा असायला पाहिजेत”.
आयरिश देश भक्त डॅनियल ओक्यानेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे ,”कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. कोणतीही स्त्री स्वतःच्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला *सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे कारण भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूती पूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते .धर्मातील भक्ती आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती पूजा ही अधःपतन आणि अंतिमता हुकूमशाहीकडे हमखास मार्ग ठरतो.
तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायला पाहिजे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकत नाही .सामाजिक लोकशाही म्हणजे काय?
तो एक जीवन मार्ग जो स्वातंत्र्य समता ,बंधुता यांना जीवनसत्वे म्हणून मान्यता देतो स्वातंत्र्य समता बंधूचा त्या तत्त्वांचा एकाच वेळी ची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही त्रयीचा एक संघ निर्माण करतात ते या अर्थाने की त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समते शिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारेक ठरेल .बंधुत्व शिवाय स्वातंत्र्य आणि समता सहभाविकरीत्या अस्तित्वात राहणार नाहीत .त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णता अभाव आहे .ही वस्तुस्थिती मान्य करून आपण सुरुवात करायला पाहिजे.
त्यापैकी एक समता आहे सामाजिक क्षेत्रात आपला समाज श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात .आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे .तर अनेक लोक दारिद्र्यात जगतात. 26 जानेवारी 1950 ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे क्षमता राहील .परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील राजकारणात प्रत्येकाला एक मत प्रत्येक मात्राचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत .आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत अशा परस्पर विरोधी जीवनात आपण किती काळ राहणार आहोत ?आपण जर अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.
हे विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केले पाहिजे अन्यथा जाना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत. ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील.
“स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत .याचा आपण विसर पडू देता कामा नये या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही यापुढे जर काही वाईट घडले ,तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही” अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे काळ वेगाने बदलतो आहे आपले लोक सुद्धा नवनवीन विचार प्रणालीचा मागोवा घेत आहेत .लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे .आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्य लोकांचे लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत .आपण लोकांचे ,लोकांकरता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखलेच पाहिजे जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देतील .त्यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये .देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहित नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संकलन कर्ता —

डॉ जयप्रकाश बोधी, नागपुर
9421725648.





















