*दलित पँथर एक संघर्ष (२९ मे १९७२)

🔥 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मरणोत्तर काळात दलित चळवळीचे नेतृत्व समर्थपणे करणारी व गावागावांतील दलित अत्याचाराविरोधात झडप घेणारी जहाल युवक चळवळ म्हणजेच दलित पँथर. थोडक्यात जाणून घेऊया दलित पँथरचा जाज्वल्य इतिहास…
▪️दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे इ.स. १९७२ साली उदयास आली.
▪️अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॅक पॅंथर या संघटनेचा प्रभाव दलित पॅंथरवर होता.
▪️साठी सत्तरीच्या दशकात दलितांवर होणारे जीवघेणे अत्याचार, हत्याकांडे, दिवसाढवळ्या दलित महिलांवरील सामूहिक बलात्कार याला वाचा फोडण्यासाठी त्या काळी क्रांतिकारी पाऊल उचलले ते म्हणजे दलित पँथरने.
🔍 *दलित पँथरच्या स्थापनेचा इतिहास 😘
इ.स. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण (मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे १९७२ ला मधु लिमयेंनी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला. या सगळ्यांचा परिणाम म्हणून दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरी केली आणि पॅंथरची पहिली बैठक सिद्धार्थ नगर (मुंबई) येथे १९७२ मध्ये भरली. या बैठकीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दलितांवरील वाढत्या अत्याचारास थांबविण्यास सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी सर्व दलित युवकांनी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र जमावे, असे आवाहन झाले. “माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू” हे सूचित करणार नामाभिधान त्यांनी स्वीकारले. प्रत्येकाला पॅंथरही आपल्या मनातील असंतोषाचे व्यासपीठ वाटत होती. सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाऱ्या तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पॅंथर चळवळीकडे पाहिले गेले.
💥 *पँथरचे आक्रमक रूप 😘
पॅंथर चळवळीतील भागवत जाधव यांच्या डोक्यावर भोईवाड्यातील मोर्चादरम्यान एका इमारतीतून दगडी पाटा फेकल्याने त्यांचा मृत्यू झाला. वरीळी दंगलीसाठी नेमलेल्या भस्मे आयोगातील काही शिफारशी स्विकारल्यानंतर पॅंथरचा दरारा वाढला. दलित पॅंथर या चळवळीचे लढाऊ आणि आक्रमक रूप वरळी दंगलीमुळे लोकांच्या पुढे आले. यानंतर पॅंथरच्या गुजरात, दिल्ली, पंजाब व लंडन येथेही शाखा स्थापन झाल्या.
👤 *नेतृत्वे* :
दलित पॅंथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी पॅंथरमधे प्रवेश केला. दलित पँथरचे नेतृत्व प्रामुख्याने नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि. पवार, जोगेंद्र कवाडे, अविनाश महातेकर, भाई संगारे, अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे असे अनेक तळागाळून चळवळीत आलेल्यांनी केले. एकूणच या चळवळीचे नेतृत्व युवक आणि विद्यार्थ्यांकडे असल्याकारणाने पॅंथरची वाटचाल जबरदस्त वेगाने झाली. पॅंथर मधील नेते हे उच्चशिक्षित साहित्यिक असल्यामुळे पॅंथरने आंबेडकरी चळवळ व साहित्याला नवसंजीवनी दिली.
👊 *दलित पॅंथरचे कार्य*
*१)* दलित पॅंथरने दलितावरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलने केले.
*२)* झोपडपट्टयांचा विस्तार व विकास घडवून आणला असून झोपडपट्टयांमधील रहिवाशांचे प्रश्न सोडविले.
*३)* विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर लढे दिले.
*४)* मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलने केले.
*५)* राखीव जागांच्या प्रश्नावर आंदोलन केले.
*६)* नवबौद्धांना सवलतीची मागणी केली.
*७)* बेरोजगारी दूर करण्यासाठी आंदोलने केली.
★ दलित पॅंथरने अशा अनेक प्रश्नांवर आंदोलने उभारून ते मार्गी लावले. शासनावर दबाव निर्माण केला.
📚 पॅंथरचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशीत साहित्य प्रकाशित करण्यास सरकारला भाग पाडले. पॅंथरच्या रेट्यामुळे बाबासाहेबांचे २४ खंड, मूकनायक बहिष्कृत भारत हे साहित्य प्रकाशित झाले.
💡 दलित एकजुटीचा सुवर्णकाळ हा सक्रिय असलेल्या दलित पँथरचा काळ होता. परंतु आपापसातील वादविवादामुळे ही चळवळ लयास गेली व अनेकांनी आपापले गट निर्माण करून आपापल्या परीने चळवळ पुढे चालू ठेवली.
👍 प्रत्येक देशामध्ये अनेक चळवळी होऊन जातात. परंतु अशाकाही चळवळी असतात, की ज्यामुळे सर्व समाज त्या चळवळीची मुख्य घोषणा आणि मागण्या यांचा विचार करायला सुरुवात करतो. त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात. त्यापैकी ‘दलित पॅंथर’ ही एक थरारक व झंझावाती चळवळ होय.
#राजेश_म्हस्के_संस्थापक_अध्यक्ष
“#जनता_दरबार_सामाजिक_संघटना_महाराष्ट्र_प्रदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?