तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.
हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे
हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्यादने मावळणारी जात आमुची नव्हे.
तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे.
काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे.
एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे.
जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच अम्हाला हवे.
चांदण्याची छाया कापराची काया
माऊलीची माया होता माझा भीमराया….
चोचीतला चारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता माझा भीमराया….
बोलतात सारे विकासाची भाषा;
लोपली निराशा आता…लोपली निराशा ;
सात कोटीमधी विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता माझा भीमराया….
झाले नवे नेते मलाईचे धनी ;
वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी रामकुंडावरी;
दगडगोटे खाया होता माझा भीमराया….. .’
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?
घाम शेतात आमचा गळे, चोर ऐतच घेऊन पळे
धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो?
न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजु , काटा कुठाय हो?
लोणी सारं तिकडं पळं, इथं भुकेनं जिवडा जळं
दुकानवालेदादा आमचा आटा कुठाय हो?
इथ बिऱ्हादड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर
या दुबळीचं धुडकं-फडकं धाटा कुठाय हो?
इथं मीठ मिरची अन् तुरी, तिथं मुरगी काटा सुरी
सांगा आम्हाला मुरगी कटलेट काटा कुठाय हो?
शोधा सारे साठे चला, आज पाडा वाडे चला
वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो?’
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.
उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
कशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.
निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्याासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.
भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.
तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे..’
तिथे आसवांची फुले हि गळावी
जिथे माउलीचे चिता हि जळाली
धूळ त्या स्थळाची मस्तकी मळावी
लाविता समाधी समाधी समोरी
दशा या जीवाची आईला कळावी
पाहण्या सदा त्या मुख माउलिचे
तिथे थोडी जागा मला हि मिळावी
वामन मला तू जाळशील जेव्हा
माधी पुढे त्या चिता हि जळावी….’
तू जन्मल्या ठिकाणी, राहून काल आलो
तू रांग्लास जेथे, तेथेच मान झुकली
ती धूळ मी कपाळी, लावून काल आलो
आई तुझी भिमाई, सातारालाच गेली
तेथेही दोन अश्रू , वाहून काल आलो
जाऊन दूर देशी, तू आणली शिदोरी
तेथे तुझेच पाणी, दावून काल आलो
दीक्षा भूमी सभोती, हर्षाने दाटलेली
नागाची नाग नगरी, पाहून काल आलो
देह जाळणार होते, मी टाळणार होतो
वामन सवेच तेथे, धावून काल आलो ‘
आई तुला कसा गं, पान्हाच येत नाही|| धृ ||
आई तुझ्या दुधाने ,हि भूक जायीन गं
हि भूक , माझ्या पोटात मायीना गं || १ ||
ज्या थोरल्या पिलांच्या , पंखात जोम आला
तो आज येथे , घरट्यात राहीना गं || २ ||
वाहवायाची भिमाई , चिंता चील्यापिल्यांची
कोणी मुळीच आता , ढुंकून पाहीना गं|| ३ ||
जो काळ गात होता , अश्रूत न्हात होता
वामन तुझा तुझी ती, गाणीच गायींना गं|| ४ ||’
‘अन्यायाची चिरा चाम्बडी,चिरा करा चिंधड्या
चिरा करा चिंधड्या नाही तर भर हाती बांगड्या
गावामधले पिसाडलेले गुंड गीधालापारी
तुटून पडती तुमच्या माझ्या माता-बहिणीवरी
चल चल त्या नराधमांच्या तोडू चला तंगड्या
बहाद्दरांची फौज फाकडी गाव कुसाला भिडून
छ्लनाराला चिरीत जावी वाघावानी चिडून
जयभिमवाल्या अशाच अपुल्या करा पलटणी खड्या
आहे का रे वामन असले तरुण इथे कोणी
सामाजक्रांतीमधून झाली पिढी ज्यांची ऋणी
नकोत नुसत्या शब्द -सुरांच्या भाषणआतल्या उड्या…’
===
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
जात होतो पुढे जात होतो पुढे
ह्यात होतो पुढे त्यात होतो पुढे
पाय त्यांचेच मागे वळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
बाग मागे आणि आग होती पुढे
पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे
पंख सारेच तेथे जळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
एक सेवक होऊन सेवा दिली
लोक उलटून म्हणतात केव्हा दिली
बोल उलटे हे जेव्हां मिळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
गोडी होती मधाची मला जोवरी
लाख लटकून होते मोहोळा परी
संपता अर्क सारे पळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
काल वामन परी पेरण्या ही कला
येत होते आणि नेत होते मला
जाणे माझे हे तेथे टळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…’
लयी नाही मागत भर माझं
इवलंसं गाडगं,
पाणी वाढ गं,
काळानं केलं काळं
जातीचं विणलं जाळं
पाण्याच्या घोटासाठी
तळमळतंय माझं बाळ
पाज आम्हाला पाणी
अन मग डोळे फाडं गं ……
गाईला हिरवा चारा
जळणाचा लाकूडफाटा
मी आणून देईन सारा
करील सारं काम तुझं मी
झाडील वाडगं ……
साऱ्यांच्या पडल्या पाया
आली ना कुणाला माया
पाण्याच्या थेंबासाठी
तळमळते माझी काया
कर्माचा ना धर्माचा
एक पोहरा वाढ गं ………..’
तुम्हीच बारा वाजविले || धृ ||
काल आम्ही लढनारांनी
कडे कडे चढनारांनी
बंड भीमाचे गाजविले || १ ||
अशाच साऱ्या बाळांनी
बाळांनी चांडाळांनी
नपुसकांनी लाजविले || २ ||
वामन वाणी लुटनार्यांनी
गली गलीच्या कुत्रांनी
भांडण सारे माजविले || ३ ||’
उठून सारा देश तुझा आज उभा तू करशील का?
उकिरड्यावर चारणारा,तिथेच राहून मारणारा
झाली आजादी तरी हिरव्या राणी चारशील का ?
आज तरी क्रांतीसाठी……..
तो धनी तू चाकर का
तुलाच थोडी भाकर का?
सांग अश्या लाचारीने पोट तरी तू भरशील का?
आज तरी क्रांतीसाठी……..
धन्वन्ताची जात पहा
बसली लाडू खात पहा
कसा उपाशी तूच असा
सांग अश्याने तरशील का ?
आज तरी क्रांतीसाठी……..
तू वनवासी आदिवासी
कंद मुले का रे खासी
तुझा लढा तू लड्ताना
सांग तू मागे फिरशील का ?
आज तरी क्रांती साठी……
वामनाच्या भटक्या जाती
वाट फुटे तिकडे जाती
आतातरी या साऱ्याची उभी वसाहत तू करशील का ?
आज तरी क्रांतीसाठी वाट भीमाची तू धरशील का ?’
आज मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने ….
गेली सारीच लाचारी आज दिल्लीच्या दरबारी
मला नेउन बसविले सात कोटीच्या बापाने….
मला चांभार बनविले एका काळ्या कसाबाने
का न कापावे मी त्याला एका रापीच्या कापाने…..
होतो मातीत दडलेला होतो मातीत पडलेला
माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने…..
काल जातीच्या सापाला ठेचले मी जरी
वामन काढला काढला रे फणा येथे त्याच जातीच्या सापाने..’
चून चून करती पायी | पोर चालत राही || धृ ||
काडीला तान्ह डोहीवर दुडी | थरथर करी कवळी कुडी |
सांगायचा गुन्हा सांगाव कुन्हा | तशीच पाणी वाहि …|| १ ||
शेताच्यावट दोयीवर पाटी | पाटीत दही दुधाची वाटी |
सांडेल बाई वाकायचं नाही होई उन्हात ल्हायी ….|| २ ||
सांजच्या पारी गवताच्या भारा | ढवळ्या गायीला आणावा चारा |
ओझ्यानं राही वाकून जाई | तशीच ओझी वाहि || ३ ||
पहाटी उठ जात्याशी झठ | लगी निघावं नदीच्या वाट |
वामनच्या घरी कष्टच करी | गाडीची सुटका नाही || ४ ||
तिथूनच जाई माझ्या माहेरची वाट
ओलांडता झाडी , लागे रामाची टेकडी
दिसते तिथून माझ्या मामाची झोपडी
झोपडीपासून वाहे झुळझुळ पाट
राही बारमाही मळा मामाचा हिरवा
तापल्या जीवाला तिथ मिळतो गारवा
पुरवितो पाणी उभ्या पिकला रहाट
उतरतो शीण मुल मामाची पाहून
मामीच्या मायेत रात्र एखादी राहून
माहेरची ओढी लागे होताच पाहत
जाता जरा पुढे लागे भीमाचा शिवार
कसलेली शेती पीक देई दाणेदार
धान्यापारी ताठ उभी जोन्धाल्याची ताट …..’
प्रत्येक स्त्रीला माहेराची ओढ असणे जितके साहजिक असते तद्वतच तिला आपल्या सासरी आपल्या पतीचा सर्वात जास्त आधार वाटणे हे स्वाभाविक असते. मात्र तिच्या सासरी सारे काही आलबेल नसेल तर मात्र तिची अवस्था अत्यंत बिकट होते. तिच्या कष्टाला पारावार राहत नाही अन तिच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु राहतात. अशा स्त्रीमनाचं अचूक वेध घेणारं चित्रण कर्डक आपल्या कवितेतून करतात.
‘वागने बाई नीट नाही भरताराची,
आईच्या घराची याद येई माहेराची
पति माला फटकेच देई
सासु बिचारी चट्केच देई
जाचणी जीवाला तीच नंदना, दिराची
पहाटी उठावे दळावं मळावं
कसं बसं शेताला पळावं
खणाची रताळी मीच, काळ्या वावराची
घरी मी करावं, दारी मी करावं
करावं तरी मी उपाशी मरावं
कुणा कीव नाही माझ्या अश्रूंच्या धारांची
पोटाला पुरेशी पेज तरी वामन
असावी सुखाची रोज तरी वामन
पाहतोच होळी तूच माझ्या संसाराची…’
तू सोडावं दारूला आता पोसावं पारूला
दारुवाल्या सरूला, तिच्या करू, नरूला
कमाई नको चारू र्र …
ती खेड्याची र्ऱ्हाणारी, जे दिल ते खाणारी
जीव जीवाला देणारी, नाव तुझ घेणारी
नको भुकेली मारू र्र ……..
तुला घरदार कळेना, तुला संसार कळेना
तुला मोटार कळेना, तुला गटार कळेना
पिऊन पडशील दारू र्र…..
तो वामन विचारी, रोज पारूला विचारी
तरी सांगंना बिचारी असा कसा तू कारू र्र ?’


