*जे चळवळीत भाग घेत नाहीत*
*ते शेणातले कीडे होत.*
__ _डॉ बाबासाहेब आंबेडकर
जे चळवळीचे कार्य करीत नाही त्यांना बाबासाहेबांनी “शेणातील किडे” असे म्हंटले आहे. ते म्हणतात, समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात… बाकीचे सर्वजण शेणातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात.
अशा माणसाला तू शेणातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस याची जाणीव करून देणे हे प्रत्येक सुशिक्षिताने आपले कर्तव्य समजले पाहिजे. ज्या शिक्षितांवर बाबासाहेबांनी हि जबाबदारी सोपवली तेच सुशिक्षित आज कोणतेही कार्य न करता शेणातल्या किड्याचे जीवन जगत असतील, तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?
चळवळ हि महापुरुषांच्या विचारांप्रमाणे करायची असते लोकांच्या कलाप्रमाणे नव्हे. जे अशी चळवळ करतात ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी तसे करीत असतात. जगात काही माणसे भित्री असतात.
माणसाने एकटे जाण्याचे धैर्य केले पाहिजे एकटे जाण्याचे धैर्य मी करतो हजारो लोक जरी माझ्या मागे नसले, तरी मी त्यांची पर्वा करीत नाही किंवा त्यांची खंतही बाळगत नाही.
बाबासाहेबांची हि भूमिका पाहिली तर ते लोकांपेक्षा भूमिकेला महत्व देत होते हे आपल्या लक्षात येईल.


