आणि मराठा समाज यांचे
जिव्हाळ्याचे नाते
त्यातील काही निवडक गोष्टी…..
1:-
महाडच्या चवदार
तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर
जावून
शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले
आणि त्यांच्या सोबत
असलेल्या कार्यकर्त्यानी “जय
शिवरायच्या” घोषणा दिल्या.
बाबासाहेबांनी महाड
चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात
शिवरायांचे
दर्शन घेवून केली.
2:-
बेळगाव येथे शिवरायांच्या ३००
व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने
म्हणून डॉ.
बाबासाहेब आंबेडकर उपस्थितहोते.
3:-
बाबासाहेब आंबेडकर पत्र
लिहतांना पत्राची सुरुवात
“जय शिवराय” लिहून करत होते.
महाराष्ट्र शासनाने
हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
4:-
ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे
शिवरायांचा राज्याभिषेक
ब्राम्हणांनी नाकारला होता.
तो मनुस्मृती हा ग्रंथ
बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून
शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला.
5:-
बाबासाहेब म्हणतात
संविधान लिहते वेळी मला
जास्त ञास झाला नाही
कारण छञपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या
डोळ्यासमोर होते.म्हणूनच
मी संविधान लिहु शकलो
6:-
बाबासाहेब आंबेडकर लहान
असतांना “कृष्णराव. अर्जुन
केळुस्कर” गुरुजींनी त्यांना “बुद्ध चरित्र”
भेट दिले
होते.
या चरित्रामुळे
बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली.
केळुस्कर गुरुजी जन्माने”मराठा” होते.
7:-
छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब
आंबेडकर
“बैरीस्टर” झाल्यावर, त्यांची कोल्हापूर
शहरात
रथातून मिरवणूक काढून फुले
उधळली होती.
8:-
राजा सयाजीराव गायकवाड
यांनी बाबासाहेबांना परदेशात
शिक्षणासाठी सहाय्य
केले होते.
सयाजीराव गायकवाड जन्माने
मराठा होते…..
“चांभार घराण्यात
जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट
अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. अरे
ज्याच्या आई
बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड
ब्रीटन चा पंतप्रधान झाला.
लाहनपणी कोळशाच्या खाणीत काम
करणारा अब्राहम लिंकन
अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला अरे पण
मानुसकी नाकारलेल्या समाजात
जन्मलेला माझा ” भिमराव ”
या देशाचा शिल्पकार झाला……….!
कुणबी चिमटा:-
कुणबी-मराठा समाज बांधवांचे ख रे शत्रू कोण? आज आपल्या मराठा-कुणबी समाज बांधवांपैकी काही लोक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच आपले शत्रू समजतात.
यावर मी सुद्घा विचार केला,की आपण बाबासाहेबांचा विरोध का करतो, स्वतःहून की दुसर्यांच्या सांगण्यावरून?
यावर वाचनही केले… यानंतर मला पडलेले काही प्रमुख प्रश्न…
१) बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा… हा मंत्र कोण्या एका धर्माला दिला नाही, तो सर्व समाज बांधवांना दिला, ज्याने याप्रमाणे कृती केली त्यांचे भलेच झाले, हे ही सत्य आहे.. मग आपण का ऐकला नाही ?
२) छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकास ब्राह्मणांनी विरोध केला तो “मनुस्मृती” याच ग्रंथाचा आधार घेऊन, एवढेच नव्हे तर शूरवीर संभाजी महाराज यांची क्रुर हत्या याच “मनुस्मृती” ग्रंथानुसार करण्यात आली, मग या ग्रंथाचा बदला सर्वप्रथम हा ग्रंथ जाळून कोणी घेतला असेल तर, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.
३) जेंव्हा संत गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे, तेव्हा बाबासाहेब तिथे गेल्यावर खाली बसायचे, लोक त्यांना म्हणायचे की बाबासाहेब आपण वर बसा, बाबासाहेब मात्र खालीच बसायचे आणि म्हणायचे की जेथे संत गाडगेबाबा असतील तेथे घाण असूच शकत नाही.
४) शिक्षण महर्षी, विदर्भभूषन डॉ. पंजाबराव देशमुख हे नेहमीच आपण बाबासाहेबांसोबत किंवा बाबासाहेबांनी आपल्या सोबत प्रत्येक कार्यात, निर्णयात रहावे असे का वाटायचे? याचा अर्थ की नक्कीच बाबासाहेबांमध्ये सर्व समाज बांधवांबद्दल प्रेम, आपुलकी होती.
५) मराठा-कुणबी यांनासुद्धा आरक्षण मिळावे, असा आग्रह धरणारे, इतरांनी विरोध केला म्हणून स्वतःच्या केंद्रिय मंत्रीपदाला लात मारणारे बाबासाहेब मराठा-कुणबी यांचे शत्रू की मित्र? आणि आज तर मंत्रीपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ आपल्याच मराठा- कुणबी बांधवांमध्ये सुरू आहे. याचा विचार मराठा-कुणबी समाजाने करणे अत्यंत आवश्यक आहे.
६) छत्रपती शाहूजी महाराज स्वतः बाबासाहेबांना भेटले असता, एकमेकांना मिठी मारली असता दोघांच्याही डोळ्यातून भळभळा अश्रू का वाहीले?
७) स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांवर कुठलाही परिणाम झाला नाही, परंतु बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे कळवल्यावर अवघ्या १४ दिवसात प्राण सोडणारे संत गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे असतील? …..
संत गाडगेबाबांचे शिक्षण तर काहीच नाही आपण तर शिकले सवरलेले आहोत….. आता वेळ आली आहे विचार करुन समजून घेण्याची…
शिवरायांचा एक मराठा
जय शिवराय…..
जय भिमराय…..


