अशा ज्या महिला ज्यांचे पतीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना निवृत्तीवेतन महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाते. ज्यांचा आधार गेलेला आहे त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनातर्फे ही योजना चालवली जात आहे. ज्या विधवा महिलांचे जीवन जगणे असे झालेले आहे ज्यांना घरून सासरच्या लोकांकडून कुठलीही आर्थिक मदत नाही, अशा सर्व महिलांना आधार देण्याचे अत्यंत स्तुत्य कार्य महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात येत आहे.
योजनेचा प्रकार
केंद्र पुरस्कृत योजना
योजनेचा उददेश
राज्यातील विधवांना दरमहा निवृत्तीवेतन.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव
सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.
दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दत
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.
योजनेची वर्गवारी
निवृत्तीवेतन
संपर्क कार्यालयाचे नाव
जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय