विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे

“बौद्धधर्माशी संलग्न झालेले ‘मिलिंद’ हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की, विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे; हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १२ डिसेंबर, १९५५.