डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार

शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!

 

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

 

जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

 

शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

 

मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.

 

स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.

 

आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.

 

स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !

 

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.

 

शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

 

लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

 

मी नदीच्या प्रवाहालाच वळवणा-या भक्कम खडकासारख आहे.

 

मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे.

 

देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.

 

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.

 

स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.

 

सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी.

 

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.

 

माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.

 

करूणेशिवाय विद्या बाळगणा-याला मी कसाई समजतो.

 

शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

 

पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.

 

मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

 

माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.

 

एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.

 

भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.

 

धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.

 

बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान.

 

धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.

 

मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.

 

सा-या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.

 

विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.

 

सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.

 

अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.

 

मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.

 

ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.

 

भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता

कोणत्याही धर्मात नाही.

 

सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.

 

महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.

 

आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?

 

हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

 

नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.

 

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

 

पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.

 

जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

 

शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

 

मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.

 

जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

 

प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.

 

मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

 

सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.

 

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

 

माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या

आंधळ्या सारखा असतो.

 

कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.

 

एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.

 

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?