














डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार :–*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार :–*
मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी नदीच्या प्रवाहालाच वळवणा-या भक्कम खडकासारख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
करूणेशिवाय विद्या बाळगणा-याला मी कसाई समजतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ग्रंथ हेच गुरू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वाचाल तर वाचाल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तिरस्कार माणसाचा नाश करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सा-या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शंका काढण्यास देखील ज्ञान लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्त्री जात समाजाचा अलंकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जय भिम